‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' : घुसमटीतून प्रसवलेली कविता
कवीला जागतिकीकरणाचं शेपूट पकडून आपल्या हाती फक्त लेंडयाच उरल्यात असं वाटतं आणि त्याचसोबत इमारती उभ्या आणि झोपडपट्ट्या आडव्या का वाढत आहेत असा प्रश्न पडतो. कोलंबसची इच्छा ही विश्वविजयाची लालसा वाटावी, बाई ही युगांयुगांची बळी वाटावी, माणसं मुर्दाड वाटावीत आणि शहरानं स्वप्न भाड्यानं ठेवावीत, या साऱ्या कल्पनाच हजारो प्रश्नांनी गुरफटून गेलेल्या मानवी आयुष्याचं व्यामिश्र चित्र उभारणारी ही कविता सक्षम वाटते.......